इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ वाढोली येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब लक्ष्मण पवार ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानिम्मीताने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, तळवाडे केंद्राचे केंद्रप्रमूख धनराज वाणी, केंद्रातील सर्व शिक्षक, सर्व गावकरी, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. अमृत जगदाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सरांच्या आठवणींना […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ त्र्यंबकेश्वर तालुक्याचा विकास व्हावा, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी या मागणीचे निवेदन त्र्यंबकेश्वर तालुका शिवसेनेचे समन्वयक समाधान बोडके पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांना शिवसैनिकांनी दिले. यावेळी टायगर व्हॅली ॲग्रो अँड ईको टुरिझम रिसॉर्ट, अंबोली डॅम, वेळुंजे ( त्र्यंबकेश्वर ) येथे सेंद्रिय शेती करणाऱ्या संजय गुणाजी बोडके या शेतकऱ्याचा सन्मान नामदार दादासाहेब […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ हरसुल आणि परिसरातील गावांमधील सततच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, हरसुलच्या जिल्हा परिषद सदस्या इंजि. रूपांजली माळेकर यांच्या पाठपुराव्याला आता यश आले आहे. नुकतीच शासनाने जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत राज्यातील ६० पाणी पुरवठा योजनांना मंजूरी दिली असून यामध्ये हरसुल गटातील चिंचवडसह ६ गावांचा समावेश आहे. चिंचवड व […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ ग्रामीण भागात बचतगट संकल्पना संजीवनी ठरली आहे. अडचणीच्या काळात सुलभ कर्ज उपलब्ध झाल्यामुळे स्वंयरोजगाराची महिलांना प्रेरणा मिळाली. म्हणून बचत गटांकडे आता एका नव्या व्यावसायिक दृष्टीकोनातून बघण्याची गरज आहे असे प्रतिपादन नगरसेविका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनी केले. बचतगटांना मार्गदर्शन’ उपक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सक्षमा […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ बदलत्या काळात मानवी जीवन धोक्यात आल्याने स्वच्छता आणि आरोग्यासाठी स्वतः काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी महामारीच्या काळात आदिवासी बांधवांना जनजागृती करत २ लाख ३७ हजार मास्क आणि ५० हजार साबण सँनिटायझरचे वाटप करून सामाजिक दायित्व जपले असे प्रतिपादन एनजीओ समन्वयक नितिन तुरनर यांनी केले. मविप्रच्या त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ आणि […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ मानवी जीवनात उत्पन्नाचे अनेक स्रोत असून आपण कृषिप्रधान असल्याने सरासरी शेतीतून मिळणारे उत्पन्न जास्त असते. म्हणून उत्पन्नाचे महत्त्व, गरजा कृषी क्षेत्र व इतर मार्गातून मिळणाऱ्या उत्पन्नाची गुंतवणूक करताना बचत कशी करावी. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात शेअर्स मार्केटचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. यातून मिळणारे फायदे तोटे पैशांची बचत, गुंतवणूक, शेअर्सची विक्री व खरेदी समजून […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल जवळील बोरीपाडा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत इयत्ता 9 वी मध्ये शिकत असलेली रोहिणी बापू वड वय 15 वर्षे, रा. खडकओहोळ, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक या विद्यार्थिनीने आज दुपारी आत्महत्या केली. दुपारी बाराच्या सुमारास वस्तीगृहातील स्वतःच्या खोलीमध्ये ओढणीने पंख्याला गळफास घेऊन तिने आत्महत्या केली आहे. याबाबत […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १० मानवी हक्कांवरील अतिक्रमण, संकट टाळण्यासह कर्तव्य पालनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. मानवी हक्क हे नैसर्गिक हक्क असून त्यावरील संकट टाळण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाचे आहे आणि त्याची जोपासना करणे काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. भागवत महाले यांनी त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात आयोजित मानवी हक्क दिनानिमित्त बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी […]
सुनिल बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. १० त्र्यंबकेश्वर जव्हार रस्त्यावर बुवाची वाडी बस थांब्याजवळ रस्त्यात मोठा खड्डा पडला आहे. ह्या खड्ड्यामुळे छोट्या मोठ्या अपघातांची मालिका सुरू झाली आहे. ह्या खड्ड्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा निकृष्ठ दर्जाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. मागील वर्षीच या रस्त्याची डागडुजी करून नावालाच मलमपट्टी करण्यात आली होती. हा रस्त्या नाशिक ते जव्हार, […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १० हरसूल जिल्हा परिषद गटातील विविध गावात भजनी मंडळांना भजनी साहित्य नसल्यामुळे अध्यात्मिक कार्याला मोठ्या अडचणी सोसाव्या लागत होत्या. याबाबत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विनायक माळेकर यांना माहिती समजली. त्यांनी वारकरी परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारचे भजनी साहित्य भजनी मंडळांना भेट दिले. यावेळी काँग्रेसचे युवा नेते मिथुन राऊत, महादेवनगरचे सरपंच विष्णु बेंडकोळी, […]