“पाण्यासाठी जीवघेणा प्रवास” करणाऱ्या वाड्यापाड्यांवर वंचित आघाडीची भेट : १५ दिवसांत प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

तुकाराम रोकडे | इगतपुरीनामा न्यूज, दि. ५

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत, वाड्यापाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागत लागलेली कसरत बघून वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अतिदुर्गम पाड्याला भेट देऊन आदिवासी बांधवांचे दुःख जाणून घेण्यात आले. पंधरा दिवसांत या वाड्या-पाड्यांवर तत्काळ उपाययोजना करून पाण्याचा प्रश्न सोडवावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे झाली. परंतु आजही देशातील अनेक भागांमध्ये ग्रामस्थ, नागरिक मूलभूत गरजांपासून वंचित आहे. अनेक राजकीय पक्षांनी सत्ता उपभोगली, परंतु भारतीय संविधानाने नागरिकांना अधिकार, हक्क व सुविधा दिल्या आहेत. त्यापासून आजही सत्ताधारी त्यांना वंचित ठेवण्याचा काम करीत आहे. पाण्यासाठी दाही दिशा वणवण करून पाण्याच्या एका थेंबासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. त्र्यंबकेश्वर आतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांना अशा प्रकारे वंचित ठेवले जाते. आज जरी हा प्रकार उघडकीस आला असेल परंतु त्र्यंबकेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी पाण्यासाठी महिलांची भटंकती निदर्शनाला येईल. खराब रस्त्यांमुळे लोकांचे होणारे हाल सुद्धा थांबले पाहिजे. प्रत्येक नागरिकाला हक्काचे पाणी, रस्ते मिळाले पाहिजे, महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरला पाहिजे. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे, तालुका संघटक गोटीराम हसननाईक, वाघेरा गणप्रमुख राम जाधव, शहराध्यक्ष मोहन सोनवणे, तालुका संघटक तुकाराम देशमुख आदी उपस्थित होते.

महिला भगिनींना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते हे दुर्दैवाने म्हणावे लागेल. देशात अनेक राजकीय पक्षांनी सत्ता उपभोगली आहे परंतु आजही ग्रामीण भागातील ग्रामस्थ मूलभूत गरजांपासून वंचित आहे. त्र्यंबकेश्वर हा अतिदुर्गम भाग असून आजही या भागांमध्ये लाईट, पाणी, शिक्षण, आरोग्य आदींच्या सुविधा पुरेपूर नसल्याने ग्रामस्थांची हेळसांड होते आहे. याकडे आम्ही विशेष लक्ष घालून न्याय मिळवून देणार आहोत.

- उमेश सोनवणे, तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

Leave a Reply

error: Content is protected !!