महाभारताचे “नऊ सार सूत्र”

ह.भ.प. चि. सूर्यकांत महाराज सहाणे
युवाकिर्तनाचार्य / भागवताचार्य
साकुर, ता. इगतपुरी, जि. नाशिक

★ “जर मुलांच्या चुकीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर शेवटी आपण असहाय्य व्हाल”  – कौरव.
★ “तुम्ही कितीही बलवान असा, परंतु अनितीने तुमचे ज्ञान, अस्त्र, शस्त्र, सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील.” – कर्ण.
★ “मुलांना इतके महत्वाकांक्षी बनवू नका की, विद्येचा दुरुपयोग करीत स्वत:चा नाश करुन घेऊन सर्वनाशाला आमंत्रण देईल.” – अश्वत्थामा.
★ “कोणाला असे वचन कधीही देऊ नका, की तुम्हाला अधर्मासमोर शरण जावे लागेल.” – भीष्म पितामह.
★ “संपत्ती, सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरूपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्म-विनाशाचे दर्शन घडविते” – दुर्योधन.
★ “विचाराने अंध व्यक्ती म्हणजे मद्य, अज्ञान, मोह, काम आणि सत्ता देखील  विनाशाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते.” – धृतराष्ट्र.
★ “मनुष्याच्या बुद्धीची सांगड जर विवेकाशी घातली असेल तर विजयाची खात्री पक्की आहे.”  – अर्जुन.
★ “प्रत्येक कामात छल व कपट निर्माण केल्याने आपण नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही.” – शकुनी.
★ “नीति, धर्म आणि नियत या कर्माचे नियम पाळल्यास जगातील कोणतीही शक्ती आपल्याला पराभूत करू शकत नाही.” – युधिष्ठिर.

या नऊ सूत्रांकडून धडा घ्या अन्यथा पुढे महाभारत होणे निश्चित आहे. जो इतरांना संपविण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो व संपतो. जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे.
माणसाचा दर्जा जात, धर्म व मिळकतीवरून ठरत नसतो तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. रामकृष्णहरी

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!