इगतपुरी तालुक्यातील शेतकरी अजूनही पीक विम्यापासून वंचित ; अधिकारी व पीक विमा कंपन्याचे दुर्लक्ष होत असल्याने खासदार हेमंत गोडसे घेणार बैठक

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २६

शेतकरी खेड्यात राहत असल्याने त्यांना ऑनलाईन अर्ज करण्याविषयी फारशी माहिती नसते. त्यातही शिक्षण कमी असल्याने शेतकऱ्यांना विमा कंपन्यांच्या नियमांचे ज्ञान नसल्याने सरकारी प्रकियांची खूपशी माहिती नसते. यामुळे विमा कंपन्यांची नियमावली त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. असे असताना अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या पिकाचा विमा भरलेला असतो. मात्र शेतकऱ्यांनी पूर्णपणे विमा कवच जरी केले असले तरी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती नसते आणि आजपर्यंत किती शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला याची माहीतीही कोणाला मिळत नाही. यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे संबंधित अधिकारी व शेतकरी यांची बैठक घेणार आहेत.

गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान होवूनही विम्याची रक्कम न मिळालेल्या इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांची आणि भारत एक्सा या विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्तिक बैठक देखील झाली होती. मात्र अजून पर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही त्यामुळे अधिकारी काय करतात असा प्रश्न पडला आहे. इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे भात पिकांचे नुकसान होवून आठ महिने उलटले तरी विमा कंपनीकडून त्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने हजारो शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीचे ७२ तासांमध्ये कंपनीकडे ऑनलाईन तक्रार केली नसल्याचे कारण सांगत विमा कंपनीने हजारो शेतकऱ्यांचे क्लेम नाकारत शेतकऱ्यांची फसवणुक करत आहेत. ऑनलाईन तक्रार केलेले नसली तरी शासनाच्या महसूल, कृषी विभागाकडून सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे मात्र झालेले आहेत तरी देखील बरेच शेतकरी विम्या पासून वंचित आहेत.

शेतकऱ्यांची फसवणुक करून नुकसान करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई करणार आहे. इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी विमा भरला असून आजपर्यंत शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही. यासाठी फक्त अधिकारी व पीक विमा कंपन्या जबाबदार आहे. याबाबात शेतकऱ्यांना न्याय देऊ.
- हेमंत गोडसे, खासदार

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!