मातृभूमी, जल, जंगल, जमिनीवर फक्त आदिवासी बांधवांचाच अधिकार ; संविधान रक्षणासाठी जागृत व्हा – हर्षवर्धन सपकाळ : मनुवादी जातीयवाद्यांच्या छाताडावर पाय देऊन आरक्षण वाचवू – लकीभाऊ जाधव : हजारो आदिवासींच्या अभूतपूर्व प्रतिसादाने आदिवासी दिन संपन्न 

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – या देशातल्या मातीच्या कणाकणावर फक्त इथल्या आदिवासीचाच हक्क आहे. ह्या मातृभूमीवर आणि जल, जंगल, जमिनीवर फक्त आदिवासी बांधवांचा अधिकार आहे. मात्र विघातक शक्ती विविधप्रकारे मागे लागला आहे. संविधानाची पायमल्ली करण्याचे काम जोरात सुरु आहे. म्हणून आता तुमच्या साथीने संविधान रक्षण करण्याची लढाई लढावी लागेल. लकीभाऊ जाधव यांच्या माध्यमातून आदिवासी नागरिकांना तारणहार लाभले आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष आदिवासी बांधवांच्या कायम सोबत आहे. अन्याय सहन करु नका, अंगातील शौर्य राहून संविधान रक्षणाची आपण शपथ घेऊया असे आक्रमक प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्या कुशल नेतृत्वाखाली नाशिक शहरात ‘जागतिक आदिवासी दिन’ अत्यंत उत्साहात आणि दणक्यात साजरा करण्यात आला. या निमित्ताने श्री. सपकाळ यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मनुवादी आणि जातीयवादी विचारांना ठेचून आणि त्यांच्या छाताडावर पाय देऊन देशातील माझे आदिवासी बांधव जागरूक झाले आहे. जल, जंगल, जमीन आणि देशाचे संविधान याबाबत रक्षण आणि हक्क मिळण्यासाठी आदिवासी बांधव आमच्या नेतृत्वाखाली एकटवले आहेत. त्यानुसार हक्क मिळवण्यासाठी नाशिक ते दिल्ली पदयात्रा काढणार आहोत. बोगस आदिवासी लोकांनी लाटलेल्या जागा रिकाम्या करून त्यांना धडा शिकवू असा घणाघात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी प्रास्ताविकात केला. “मत छेडो आदिवासी को ” असा इशाराही त्यांनी केंद्र सरकारला दिला. मान्यवरांच्या हस्ते यावेळी दिमाखदार कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देण्यात आले. लकीभाऊ जाधव यांचे यावेळी अभिष्टचिंतन करण्यात आले.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्या कुशल नेतृत्वाखाली नाशिक शहरात ‘जागतिक आदिवासी दिन’ अत्यंत उत्साहात आणि दणक्यात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रॅलीने संपूर्ण नाशिक शहर व जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले.​ जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून काढण्यात आलेल्या या भव्य रॅलीची सुरुवात मालेगाव स्टॅन्ड येथून झाली आणि सांगता गोल्फ क्लब मैदानावर करण्यात आली. या रॅलीमध्ये नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, पालघर, ठाणे, मुंबई, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आदी कानाकोपऱ्यातून आदिवासी बांधवांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी हजारो तरुणांनी व नागरिकांनी आदिवासी बांधवांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. डीजे, आदिवासी वाद्य, ढोलताशांचा गजर, पारंपारिक विविध आदिवासी लोकनृत्य आणि लोकसंगीताच्या तालावर सहभागी झालेला तरुण वर्ग रॅलीचे मुख्य आकर्षण ठरला. आदिवासी संस्कृतीचा जयघोष आणि विविध घोषणाबाजीमुळे संपूर्ण नाशिक शहर अक्षरशः दनाणून गेले होते. ​या ऐतिहासिक आणि भव्य रॅलीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सहभाग घेत आदिवासी बांधवांचा उत्साह वाढवला. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या सोहळ्यात सहभागी झाले होते. ​या रॅलीच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती, परंपरा, हक्क आणि त्यांच्या गौरवशाली इतिहासाचा संदेश देण्यात आला. गोल्फ क्लब मैदानावर या रॅलीचा समारोप विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, रमेश कहांडोळे, अ. ज. सेल जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, शहराध्यक्ष निलेश खैरे, मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, संदीप भवर, नगरसेविका मयुरी पवार, माजी नगरसेवक सुदाम कोंबडे, इगतपुरी तालुकाध्यक्ष रामदास पा. धांडे, आकाश पारख, जेष्ठ नेते निवृत्ती कातोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी विकास परिषदेचे किरण खाडम, इंजि. गणेश गवळी, प्रविण भोये, जीवन भोये, रोहित वाघमारे, श्याम हिरणे, दौलत मेमाणे, मच्छिन्द्र डगळे आदींनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!