शेतकऱ्यांनी ३० जून पूर्वी ई – केवायसी करावी – तालुका कृषी अधिकारी रामदास मडके 

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्माननिधी (पीएम किसान) योजनेच्या लाभासाठी पुढील हप्ता मिळण्यासाठी ३० जून पूर्वी आपली ई – केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न करणारे शेतकरी मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहतील अशी माहिती इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी दिली. केंद्र शासनाने पीएम किसान सन्माननिधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत व पारदर्शक ठेवण्यासाठी यापुढे ही केवायसी वार्षिक पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. तरी ३० जून पर्यंत ई – केवायसी पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार नाही. यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीत ई -केवायसी पूर्ण करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, सहायक कृषी अधिकारी गावागावी शेतकऱ्यांना याबाबत माहिती देत आहेत. सहायक कृषी अधिकारी शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे केवायसी पूर्ण करून देत आहेत.

सीएससी सेंटर, तलाठी कार्यालय अथवा बँकेत जाऊन शेतकरी बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी करू शकतात. मोबाईलद्वारे देखील शेतकरी पीएम किसान किंवा उमंग ॲप डाऊनलोड करून मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड टाकून घरबसल्या केवायसी पूर्ण करू शकतात. – किशोर भरते, उप कृषी अधिकारी इगतपुरी

error: Content is protected !!