
इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र शासनाचा सन २०२१ चा शेतीमित्र पुरस्कार चाळीसगाव दडपिंप्री येथील नाना भाऊसिंग पाटील यांना प्रदान करण्यात आला. मुंबई येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते १ लाख २० हजार रुपये पारितोषिक व सन्मानपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शेतीमित्र नाना पाटील गेल्या अनेक वर्षांपासून कृषी व विस्तार कार्यरत असून कृषी लेखन, सेंद्रीय शेती, शासनाच्या योजना या विषयी समाज व प्रसार माध्यमातून ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. त्याच्या या कार्याची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.