इगतपुरीनामा न्यूज – मुंबईहुन नासिकला प्रवासी घेऊन जाणाऱ्या भरधाव इको वाहनाला मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान अपघात झाला. वेगात असलेले हे वाहन महामार्गावर वाडीवऱ्हे पोलीस चौकीजवळ पलटी होऊन अपघात घडला. ह्या अपघातात इको वाहनात प्रवास करणारे ८ प्रवासी जखमी झाले आहेत. कौशल्या आनंदा गायकवाड वय ६०, सावित्री यल्लय्या गुंजाळ वय ७०, अनिता यल्लय्या गुंजाळ ५०, आनंदा यल्लय्या गुंजाळ वय ५३ सर्व राहणार मुलुंड, मुंबई, दीपक गुंजाळ वय ६० रा. दौंड, वाहनचालक पांडुरंग मारुती लेंडवे वय ५५ रा. ठाणे, सोनाली उरुडे वय २२ रा. मध्य प्रदेश अशी जखमीची नावे आहेत. अन्य दोघे किरकोळ जखमी अपघातस्थळावरून निघून गेले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेला याबाबत माहिती समजताच रुग्णवाहिकेने समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन सर्व जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ह्या सेवेमुळे जखमी प्रवाश्यांना वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचा प्राण बचावला आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group