२ जैन साध्वी महिलांचा अपघातात मृत्यू ; कसारा घाटात पहाटे झाला अपघात

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटातील हॉटेल आँरेज समोर गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास कंटेनरच्या धडकेत दोन जैन महिला साध्वी यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कसारा घाटातून नाशिक येथील पवननगर स्थानकात चातुर्मास कार्यक्रमासाठी परम पूज्य श्री सिद्धाकाजी म सा व परमपूज्य श्री हर्षाईकाजी महाराज ह्या पहाटेच्या सुमारास नाशिकला पायी प्रवास करत होत्या. यावेळी एका कंटेनरने पिकअपला आणि ओमनी कारला धडक दिल्यानंतर पायी चालणाऱ्या महिला साध्वी यांना दिली धडक दिल्याने त्यांचा या अपघातात जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यातील जैन बांधवांमध्ये शोक व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!