विद्यार्थ्यांच्या जीवनात गुरूचे महत्त्व अनन्यसाधारण – भाऊसाहेब खातळे : केपीजी महाविद्यालयात गुरुपौर्णिमा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

विद्यार्थ्यांच्या जीवनात गुरूचे स्थान महत्त्वाचे व अनन्यसाधारण असून चांगल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्याच्या जीवनात आमूलाग्र बदल होत असतो. गुरु हा चांगली दिशा दाखवून संस्कार करण्याचे कार्य करीत असतो असे प्रतिपादन मविप्रचे संचालक भाऊसाहेब खातळे यांनी केले. कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमात श्री. खातळे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, महेश पाटील, मिनाक्षी पवार, प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, डॉ. डी. डी. लोखंडे, प्रा. एस. बी. फाकटकर उपस्थित होते.

श्री. खातळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी कार्यमग्नता, सातत्य, शिस्तप्रियता या गुणांचा अवलंब करावा. जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे म्हणाले की विद्यार्थ्यांनी कोणत्याही एका खेळामध्ये प्राविण्य मिळवून क्रीडा क्षेत्रातील संधींचा अभ्यास करावा. संस्थेने क्रीडा प्रबोधिनी उभारून विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य करावे. प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, महेश पाटील, सारिका पाळदे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व आपल्या भाषणातून विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. डी. डी. लोखंडे यांनी केले. आभार पर्यवेक्षक प्रा. एस. बी. फाकटकर यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!