घोटीत प्रसिद्ध कवींचे कविसंमेलन संपन्न : वासुदेव चौक मित्रमंडळाचे आयोजन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३

नाशिक येथील ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला घोटी येथे प्रतिथयश दिग्गज कवींचे कविसंमेलन चांगलेच रंगले. प्रसिद्ध कवींनी उपस्थित नागरिकांशी यावेळी दीर्घ संवाद साधला. उत्तमोत्तम कवितांच्या रचनांनी घोटीचे ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले. ह्या दिलखेचक कार्यक्रमाचे आयोजन वासुदेव चौक मित्रमंडळाचे निलेश जोशी, बाळासाहेब पलटणे, अरुण म्हात्रे दिग्गज कवी, गणेश कडू, सदानंद भटाटे आदींनी केले होते. उपस्थित साहित्यिकांचा घोटीकरांच्या वतीने सन्मान करण्यात आला. ह्या कार्यक्रमाला दिग्गज कवी अरुण म्हात्रे यांच्यासह अनेक कवी हजर होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!