५ ठार, ४ गंभीर जखमी ; ३०० फूट दरीत टँकर कोसळून अपघात : कसारा घाटात झाली घटना ; मदतकार्य सुरु

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक मुंबई महामर्गावर नवीन कसारा घाटातील बलगर पॉइंट जवळ दूध टँकरला अपघात झाला आहे. वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा टँकर तीनशे फूट दरीत कोसळला आहे. ह्या घटनेत ५ जण ठार झाले असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. रूट पेट्रोलिंग टीम, आपत्ती व्यवस्थापन टीम आणि महामार्ग पोलिसांना माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले आहे. पावसामुळे मदत कार्यात अडथळा येतो आहे. हायवे पोलीस आणि NHAI चे समीर चौधरी, सुरज आव्हाड, सचिन भडांगे, शिवा कातोरे  देविदास म्हसणे, संदीप म्हसणे, आणि रुग्णवाहीका टीमने दोरीच्या साहाय्याने दरीत उतरून ४ गंभीर जखमींना दरीतून बाहेर काढले. अजूनही तीन ते चार जण अडकले असल्याचा अंदाज आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र कैलास गतीर यांनी जखमींना इगतपुरी आणि कसारा येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे मयत आणि जखमी व्यक्तींची नावे अद्याप समजली नाही.

व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी https://youtu.be/kKj7XqLa0fE?si=-FeJI0AHnv44hx41 येथे क्लिक करावे

Similar Posts

error: Content is protected !!