IIT-JEE… NEET… पॅकेज… करिअर… हे आजच्या युगातले परवलीचे शब्द बनलेत… शिक्षण म्हटलं की स्पर्धा असणार हे मान्य; मात्र JEE आणि NEET यांसारख्या कस बघणाऱ्या जीवघेण्या स्पर्धेच्या खोल गर्तेत ढकलण्याआधी लेकरांचा कल, त्यांची क्षमता याचा विचार किती पालक करतात? परिणामी मुलांच्या मनावर प्रचंड दडपण आणि ताण येतो. केविलवाणी होऊन जातात बिचारी मुलं. शिकणं नकोसं होऊन जातं. शिक्षण घेताना आपली मुलं ‘मार्क्स मशीन‘ आणि पुढं जाऊन ‘मनी मशीन‘ बनली पाहिजेत का? आपल्याला मुलांसोबत जगायचं नाही का? जगायचंय ना म्हणूनच उठता बसता आपल्या लेकरांची कोणाशी तुलना करण्याआधी, करिअर…. पॅकेज… यातून थोडंसं बाहेर येऊन पालकांनी आजच्या काळातलं पालकत्व नीट समजून घ्यायला हवं. शेवटी असं आहे की, आपण मुलांचे पालक आहोत मालक नाहीत! याच विषयावरील भाऊसाहेब चासकर आपल्याशी संवाद साधत आहेत…👇🏾
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group