इगतपुरी तालुक्यातील ‘ह्या” गावांचे रेल्वेगेट दुरुस्तीसाठी २ दिवस राहणार बंद : नागरिकांनी सहकार्य करण्याचे रेल्वेकडून आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ – इगतपुरी तालुक्यातील दोन रेल्वेचे गेट दुरुस्तीसाठी बंद राहणार आहेत. महत्वपूर्ण बाजारपेठ असणाऱ्या घोटी आणि माणिकखांब ह्या दोन ठिकाणच्या गावातील रेल्वेगेट दुरुस्तीच्या कामांसाठी २ दिवस बंद राहणार आहे. वाहतूक आणि जाण्यायेण्यास गेटवरून मनाई करण्यात आलेली आहे. घोटीचे रेल्वेगेट दि. १९ मार्चला सकाळी ९ वाजेपासून ते २० मार्चच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. माणिकखांब येथील रेल्वेगेट दि. २१ मार्चला सकाळी ९ वाजेपासून ते २२ मार्चच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. याबाबत वरिष्ठ रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. देवळे गावाकडून सिन्नर फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याने घोटीकडे यायला जायला पर्यायी मार्ग आहे. ह्या मार्गाने येण्या जाण्यासाठी नागरिकांना हा पर्यायी मार्ग वापरावा लागणार आहे. माणिकखांब येथील नागरिकांना मात्र कोणताही पर्यायी मार्ग नसल्याने त्यांना दोन दिवस अडचण सहन करावी लागणार आहे.

Similar Posts

error: Content is protected !!