
इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे येथील माध्यमिक विद्यालयाला व्हेरिटीस इंडिया कंपनीकडून तीन संगणक संच वितरण करण्यात आले. बेलगाव तऱ्हाळे येथे क्रांतीवीर व्ही. एन. नाईक माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळावे यासाठी संचालक मंगेश नागरे यांनी प्रयत्न केले. त्यानुसार व्हेरिटीस इंडिया कंपनी लच्या सहकार्यातून तीन संगणक संच देण्यात आले. कार्यक्रमाला माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, व्हेरिटीस इंडियाचे अधिकारी मनोज पाटील, ईफोसिस इंडियाचे प्रदीप निभोरकर, आयटीआय कॉलेजचे प्रा. हेबांडे, विजय कर्डक, साहेबराव आव्हाड, शरद गीते, मुख्याध्यापक आर. एल. अलगट, मुख्याध्यापक प्रदीप ढेंगळे, एस. आर. आव्हाड, पी. जे. साळवे, एस. बी. सांगळे, एन. बी. नेहे, के. बी. चौरे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात शासनासह लोकसहभागातून सहकार्य झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही चांगली प्रगती करू शकतात. व्हेरिटीस इंडिया कंपनीच्या प्रशासनाने याबाबत जाणीव ठेवून आज दिलेले योगदान महत्वाचे आणि मोठे आहे. याबद्दल त्यांचे आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार गावाच्या वतीने व्यक्त करतो असे मनोगत माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांनी व्यक्त केले. यावेळी प्रा. हेबांडे, मुख्याध्यापक अलगट यांनीही मनोगत व्यक्त केले. आभार पी. के. साळवे यांनी मानले