तारांगणपाडा येथे दूषित पाण्यामुळे अनेक नागरिकांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास

इगतपुरीनामा न्यूज, दि. 16

इगतपुरी तालुक्यातील तारांगणपाडा येथील 15 पेक्षा अधिक नागरिकांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील विविध हॉस्पिटलमध्ये ह्या रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. घोटी, नाशिक येथील खाजगी रुग्णालयांमध्ये काही नागरिक उपचार घेत आहेत. एकाच वेळेस पंधरा ते वीस जणांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन नेमके काय करत आहे असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. आरोग्य विभागाने तातडीने दखल घेतली असून उपाययोजना सुरु केल्या आहेत. अद्याप नमुन्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. दूषित पाण्याच्या वापरामुळे ग्रामस्थांना हा त्रास होत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!