इगतपुरीनामा न्यूज, दि. १
कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या घोटी शहरात वाढू लागल्याने अखेर घोटी ग्रामपालिकेने उद्या दि. 2 ते 4 एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. संक्रमण फैलावण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरातील कायमच असणारी गर्दी कारणीभूत मानली जाते. शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गांवर नाशिक शहराच्या धर्तीवर प्रवेशशुल्क योजना सुरू केल्यास गर्दीला आळा बसू शकतो, असे मत व्यक्त होत आहे.
![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/04/IMG-20210401-WA0033.jpg)
![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/04/IMG-20210401-WA0033.jpg)
![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/04/IMG-20210401-WA0034.jpg)