
इगतपुरीनामा न्यूज – ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामविकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा संपन्न झाली. या सभेत ग्रामपंचायत प्रशासक आणि पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. अभियानाच्या माध्यमातून गावागावांत विकासाची स्पर्धा निर्माण होऊन लोकचळवळीला नवसंजीवनी मिळणार आहे. भारत हा कृषिप्रधान देश असून गाव हे त्याचे केंद्रबिंदू आहे. गावांचा शाश्वत विकास साधल्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही असे ग्रामविकास अधिकारी हर्षिता पिळोदेकर याप्रसंगी म्हणाल्या. या सभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे, ग्रामस्तरीय समितीची स्थापना करणे, २०२५-२६ अंतर्गत विषयावर लहान गट स्थापन करणे, सुशासन युक्त पंचायत समिती, सक्षम पंचायत (स्वनिधी, सीएसआर व लोकवर्गणी ) समिती, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव समिती, मनरेगा व इतर योजना अभिसरण समिती, गावपातळीवरील विविध संस्था सक्षमीकरण समिती, उपजीविका विकास, सामाजिक न्याय समिती, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण समिती, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पंधरवाडा साजरा करणे, सिंगल युज प्लास्टिक उत्पादन, वितरण, विक्री व वापर यांच्या बंदीची कडक अंमलबजावणी करणे, विविध योजना व अभियान प्रभावीपणे राबवणे आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला.
