
इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण मध्यवर्ती बाजारपेठ असणाऱ्या घोटी शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. अनेक वर्षांपासून पाणी प्रश्नावर परिणामकारक तोडगा निघत नसल्याने हवालदिल झालेल्या नागरिकांना महाराष्ट्र शासनाने शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त खुशखबर दिली आहे. घोटीकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या पाणी पुरवठा योजनेला शासनाने आज मंजुरी दिली. १८ कोटी ३९ लाख ७९ हजार रुपयांची मंजुरी मिळाल्याने अखेर घोटीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे. घोटी ग्रामपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी अविरत प्रयत्न करून कोट्यवधी रुपयांची योजना अखेर घोटीकरांना दिल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
राज्याचे पाणी पुरवठा मंत्री.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते घोटीच्या पाणी पुरवठा मंजुरीचा शासन निर्णय घोटी ग्रामपालिका सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ह्या योजनेला मंजुरी मिळाली आहे. घोटी शहरात ह्या योजनेसाठी नागरिकांसाठी ग्रामपालिका पदाधिकाऱ्यांनी सातत्याने प्रयत्न केले. शिवसेना नेते कुलदीप चौधरी, ग्रामपालिका सरपंच गणेश गोडे, उपसरपंच अरुणा जाधव, सदस्य रामदास भोर, संजयमामा आरोटे, श्रीकांत काळे, स्वाती कडु, रुपाली रुपवते, सचिन गोणके, रविंद्र तारडे, कोंड्याबाई बोटे, संजय जाधव, भास्कर जाखेरे, सुनिता घोटकर, सुनंदा घोटकर, वैशाली गोसावी, मंजुळा नागरे, अर्चना घाणे, ग्रामविकास अधिकारी रविंद्र धुंदाळे यांच्या प्रयत्नांनी पाणीपुरवठा योजनेला यश आल्याने नागरिकांनी जल्लोष केला.
