
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम उद्या शनिवारी २५ जुलैला पहाटे ६ वाजेपासून होणार आहे. भाविकांसाठी महाआरती व फराळ प्रसाद व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुंबई आग्रा महामार्गाशेजारी दारणा नदीच्या किनारी असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक समस्त चव्हाण बंधू पाटील परिवार माणिकखांब यांनी केले आहे. महाआरतीनंतर श्री विठ्ठल रुक्मिणींचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना फराळाचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. या पवित्र धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन श्री विठ्ठल-रुक्मिणींचे दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.