
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. युवासेना तालुका उपप्रमुख, शहरप्रमुख यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत राजीनाम्यांची घोषणा केली. निवडणूक प्रक्रियेत त्यांना विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केल्याने नाराजी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. पक्षासाठी दोन वर्षांपासून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी न देता, ऐनवेळी पक्ष प्रवेश केलेल्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी “पक्षहिताचे राजकारण न करता स्वार्थाचे राजकारण केले” असा आरोप शहरप्रमुख भूषण जाधव आणि उपशहरप्रमुख विष्णू डावखर यांनी केला. सामूहिक राजीनाम्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (उबाठा) गटात प्रवेश केला आहे. इच्छुक उमेदवारांना शिवसेना (उबाठा) पक्षाने उमेदवारीही दिल्याची माहिती देण्यात आली.