कर्तव्य आणि मानवतेचा अनोखा संगम : प्राणाची पर्वा न करता तहसीलदार बारवकर, पीआय बळफ यांनी आदिवासी बांधवांना दिले जीवदान : आदिवासी नेते लकीभाऊ जाधव यांनी केला अधिकाऱ्यांना सलाम 

इगतपुरीनामा न्यूज – कर्तव्य आणि माणुसकी ही कागदावर किंवा कार्यालयात बसून पाळायची नसतात, तर प्रसंगी स्वतः मैदानात उतरून ती सिद्ध करावी लागतात.” याचा प्रत्यय इगतपुरी तालुक्यात आला. यासह संकटाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केवळ मानवधर्माला आणि कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या व्यक्ती समाजात क्वचितच पाहायला मिळतात. इगतपुरी तालुक्यात अशा प्रकारे तहसीलदार अभिजित बारवकर, पोलीस निरीक्षक घनश्याम बळफ ह्या धाडसी आणि कर्तव्यकठोर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पिंप्री सदो येथील पूरपरिस्थितीत अडकलेल्या १६ आदिवासी बांधवांच्या मदतीसाठी धाव घेत, स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्या या अतुलनीय साहसाबद्दल आणि मानवीय दृष्टिकोनाबद्दल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी त्यांना सलाम करून कौतुक केले आहे.

अतिवृष्टी आणि पुरामुळे पिंप्री सदो येथे भीषण संकट ओढवले होते. सततच्या मुसळधार पावसामुळे संपर्क तुटलेला असताना अनेक कुटुंबे या भागात अडकून पडली होती. प्रशासकीय यंत्रणा पोहोचून इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर, पोलीस निरीक्षक घनश्याम बळफ यांनी विभागाचे स्वतः कोणतीही तमा न बाळगता पुरात धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या अधिकाऱ्यांनी प्रतीक्षा न करता स्थानिक तरुणांच्या मदतीने बचाव कार्याची सूत्रे हातात घेतली. लहान मुले, वृद्ध आणि महिला यांना खांद्यावर व सुरक्षित साधनांच्या सहाय्याने पुराच्या पात्रातून बाहेर काढले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आदिवासी कुटुंबाला जीवदान दिले. सर्व आदिवासी बांधवांना सुरक्षितपणे छावणीत हलवले आणि त्यांच्या खाण्यापिण्याची व औषधोपचाराची तात्काळ सोय केली. वरिष्ठ पदावर असूनही केवळ हुद्दा न मिरवता स्वतः जमिनीवर उतरून ग्राउंडवर कार्य करणाऱ्या या अधिकाऱ्याच्या धैर्याची प्रशंसा लकीभाऊ जाधव यांनी केली. खाकी असो वा खादी किंवा प्रशासकीय अधिकारी जर मनात जनसेवेची खरी जिद्द असेल तर कोणताही अधिकारी लोकांचा खराखुरा ‘हिरो’ बनू शकतो अशी प्रतिक्रियाही श्री. जाधव यांनी दिली.

error: Content is protected !!