२ अल्पवयीन मुलींचे इगतपुरीतुन अपहरण ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील टिटोली रेल्वे क्वार्टर येथून १४ वर्ष आणि ११ वर्षीय २ अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी इगतपुरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मुलीच्या आईने फिर्याद दिली असून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित दोन्ही अल्पवयीन मुली इगतपुरी तालुक्यातील टिटोली रेल्वे क्वार्टर येथे वास्तव्यास होत्या. १० मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजेनंतर दोघी अचानक घरातून बेपत्ता झाल्या. कुटुंबियांनी आसपासच्‍या परिसरात तसेच नातेवाईकांकडे चौकशी केल्‍यानंतरही त्या न सापडल्‍याने अखेर मुलीच्‍या आईने अज्ञात व्यक्तीने मुलींना काही तरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप करीत तशी फिर्याद इगतपुरी पोलीस ठाण्‍यात दाखल केली. या फिर्यादीनंतर इगतपुरी पोलिसांनी अज्ञात व्‍यक्‍तीविरोधात अपहरण केल्याचा गुन्‍हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बेपत्ता मुलीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

error: Content is protected !!