सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत मोबाईल आणि टीव्हीला प्रतिबंध : २ तासांच्या वेळेत मैदानी खेळ आणि भौतिक अभ्यास करण्याचे नियोजन 

इगतपुरीनामा न्यूज – सध्याच्या डिजिटल युगात मुलं मोबाइल, टीव्हीच्या आहारी गेली आहेत. तंत्रज्ञानाच्या अतिरिक्त वापरामुळे मुलांची वागणूक, बोलणं बदलत चाललं आहे. याचे अनेक वाईट परिणाम होतात. यामध्ये आरोग्य समस्या, मानसिक स्वास्थ, सामाजिक दुरावा, वेळेचा अपव्यव असे विविध प्रतिकूल परिणाम होतात. मात्र पालकांनी वेळीच याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथे १५ जून पासून रोज संध्याकाळी ६ ते ८ वाजे पर्यंत मुलांना मोबाईल व टीव्हीचा चा वापर करण्यावर प्रतिबंध करून अनोखा उपक्रम राबवला जात आहे. २१ जून जागतिक योगा दिनानिमित्त संपूर्ण गावात  फेरी काढून जनजागृती करण्यात आली. ह्या उपक्रमात गावातील सर्व विद्यार्थी,पालक सहभाग घेत आहेत. या २ तासाच्या वेळात मैदानी खेळ, भौतिक अभ्यास असे उपक्रम करावे असे आवाहन सुजान ग्रामस्थ व गावातील कला, क्रीडा व शैक्षणिक प्रगती समिती करत असून उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी प्रयत्न करत आहे. आमच्या गावात काही सुजान ग्रामस्थ, शैक्षणिक समिती यांनी एकत्र येत मोबाईल, टीव्हीचा अतिरिक्त वापराचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ नये यासाठी या उपक्रमातून हा प्रयत करत आहोत. देशाची पुढील भविष्य आताची युवा पिढी आहे ती सुदृढ, शिक्षित असेल तरच देशाचे भविष्य चांगले निर्माण होईल अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!