
इगतपुरीनामा न्यूज – आरोग्यावरील खर्चामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडते. ही समस्या ओळखून केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ गोरगरीब आणि गरजू लोकांसाठी वरदान ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति कुटुंब दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार मिळतात. त्यामुळे नागरिकांनी तातडीने आपले ‘आयुष्मान कार्ड’ काढले पाहिजे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी घोटी येथील मातोश्री हॉस्पिटलमध्ये आरोग्यमित्र /आरोग्य दूत विनाशुल्क कार्ड काढून देणार आहेत. ह्या योजनेनुसार उपचारासाठी शासनाने इगतपुरी तालुक्यात घोटी येथील मातोश्री हॉस्पिटलला अंगीकृत केले आहे. येथे भेट देऊन आपले आरोग्य सुरक्षित करावे असे आवाहन मातोश्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. जितेंद्र चोरडिया यांनी आहे. अधिक मार्गदर्शनासाठी 9607011611 ह्या मोबाईलवर संपर्क साधावा. आयुष्मान कार्ड काढल्यावर सरकारी आणि सूचीबद्ध खासगी रुग्णालयांमध्ये ५ लाखांपर्यंतचे उपचार पूर्णपणे मोफत आहेत. शस्त्रक्रिया, औषधोपचार, निदान चाचण्या, रुग्णालयात भरती होण्याचा खर्च आणि डिस्चार्ज झाल्यानंतरच्या १० दिवसांपर्यंतचा खर्च दिला जातो.
या योजनेत कुटुंबातील सदस्यांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नसून रुग्णालयात कोणतेही पैसे भरण्याची गरज नाही, पूर्णपणे कॅशलेस सुविधा आहे. कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आवश्यक आहेत. आपले नाव शिधापत्रिकेत नाही किंवा आपल्याकडे कुठलीही वैध शिधापत्रिका नसल्यास तहसीलदार कार्यालयाचे पत्र घेऊन सुद्धा आपण आयुष्यमान कार्ड काढू शकतो. घोटी येथील मातोश्री हॉस्पिटलमध्ये नागरिक मोफत कार्ड काढून घेऊ शकतात. जवळच्या केंद्रावर जाऊन नोंदणी करू शकतात. अनेक नागरिक आजही या योजनेपासून अनभिज्ञ आहेत. आपल्याकडे किंवा आपल्या परिसरातील गरजू कुटुंबांकडे हे कार्ड नसेल, तर त्यांना माहिती देऊन या योजनेची नोंदणी करण्यास मदत करा. एक छोटेसे पाऊल तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याचे रक्षण करेल. त्वरा करा! आरोग्य सेवेचा लाभ घ्या आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता द्या असेही डॉ. जितेंद्र चोरडिया म्हणाले.